औरंगाबाद छावणी गॅस्ट्रो उद्रेक प्रकरणी जाणीवपूर्वक हलगर्जी झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई
या प्रश्नी सदस्य सर्वश्री सरदार तारासिंह, इम्तियाज जलील, दिलीप वळसे-पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, औरंगाबाद छावणी परिसरातील भूमिगत जलवाहिनी 40 वर्षे जुनी असून या भागात गळती आहे हे लक्षात आल्यानंतर तेथे नवीन पाईप टाकून 22 नोव्हेंबरपासून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. विविध विभागाच्या माध्यमातून या परिसरात उद्भवलेला गॅस्ट्रो उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी छावणी मंडळाकडून उपाययोजना करण्यात आली आहे.