Breaking News

कर्जाचा बोजा उतरला; शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर फुलले हसू

सातारा, दि. 14, डिसेंबर - सातारा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या दोन भागात मोडणारा आहे, त्यातला एक हा सह्याद्रीच्या माथ्यावरचा आहे तर दुसरा भागा हा पर्जन्यमान छायेचा आहे. त्यामुळे या दोन्ही भागातले पिके वेगवेगळी आहेत. मागच्या दोन वर्षात पाऊस म्हणावा तसा पडला नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. अनेकांची पीक कर्जाची थकबाकी राहिली होती. या वर्षी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांच्या दिडलाखा पर्यंतचे कार्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. सातार्‍यातील अनेक अल्पभूधारक शेतकर्‍यांना यात लाभ मिळाला आणि त्यांच्या डोक्यावरचा मोठा आर्थिक भार कमी झाल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे.


प्रत्यक्षात लाभा मिळालेल्या शेतकर्‍यांच्या प्रतिक्रीया
विनोद प्रल्हाद देखणे, मु.पो. वाढे ता.जि. सातारा : माझ्या वडलांनी पिक कर्ज घेतले होते. वडलांच्या मृत्युनंतर मी घरातील थोरला असल्यामुळे हे कर्ज फेडण्याची जबाबदारी माझ्यावर आली. माझ्यावर 59 हजार 695 कर्ज होते. हे कर्ज शासनाने माफ केल्या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्जमाफीमुळे माझ्या मुलाचे शिक्षण व माझ्या भावाची जबाबदारी उचण्यास मदत होणार आहे. कर्जमाफी केल्याबद्दल शासनाचे मी आभार मानतो.
विठ्ठल बाजीराव चव्हाण, मु. सांगवी पो. भोसे, ता. कोरेगाव : मी अडीच एकरावर विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज काढले होते. ऊसाबरोबर आल्याचे पिक घेतले होते. पाणी कमी पडल्यामुळे आल्याचे पिक खराब झाले. त्यामुळे घेतलेले कर्ज मी फेडू शकलो नाही. शासनाने माझे 1 लाख 2 हजार 656 रुपयांचे कर्ज माफ केले. यामुळे मी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालो. यापुढे चांगल्या पद्धतीने शेती करणे. शासनाने कर्जमाफी केल्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो.

बाजीराव दत्तू नांदे मु. सांगवी पो. भोसे, ता. कोरेगाव : माझे वय 95 वर्ष आहे. माझ्या शेतातील विहिरीला पाणी कमी असल्यामुळे माझे पीक वाया गेले. त्यामुळे मला कर्जाची परतफेड करता आली नाही. शासनाने कर्जमाफी केली व माझ्यावरचा मोठा भार कमी केला. मी शासनाचे आभार मानतो.


तानाजी सोपान मोरे, मु.पो. सासुर्वे, ता. कोरेगाव : मी 40 गुंठे क्षेत्रासाठी 34 हजार रुपये कर्ज घेतले होते. पाणी नसल्यामुळे माझे ऊसाचे पीक वाळून गेले व माझ्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली. शासनाने कर्जमाफी केल्यामुळे मी आता आनंदी व समाधानी आहे.