अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची सुयोगला भेट
लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या, पत्रकारितेतील नवे बदल, धावपळीच्या युगातील वाढता तणाव आदी विविध बाबींबर त्यांनी मनमोकळेपणे भावना व्यक्त केल्या. माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा जनमानसावर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे वस्तुनिष्ठ वृत्तांकनाची जबाबदारी पत्रकारांवर असते, असे त्यांनी यावेळी सांगितले. शिबिरप्रमुख दिलीप जाधव व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक मोहन राठोड यांनी श्री. बापट यांचे स्वागत केले.