Breaking News

रणजी’च्या अंतिम फेरीत धडक; विदर्भ क्रिकेट संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

रणजी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारलेल्या विदर्भाच्या क्रिकेट संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून दिल्लीविरूद्धच्या अंतिम लढतीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आठवेळा रणजी विजेत्या कर्नाटकचा उपांत्य सामन्यात पराभव करणे ही कौतुकाची बाब असून लहान शहरातील खेळाडूंचा प्रामुख्याने समावेश असलेल्या विदर्भाच्या संघाने यंदाच्या स्पर्धेत केलेली कामगिरी प्रशंसनीय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.