Breaking News

जोगेश्‍वरीत 29 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा

मुंबई, दि. 14, डिसेंबर - जोगेश्‍वरीमधील बालविकास शाळेत 29 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना शाळेजवळच्या कोकण रुग्णालयात दाखल क रण्यात आले असून सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. 

महानगरपालिकेच्या माध्यमातून खासगी संस्थांना खिचडी वाटपाचे काम देण्यात येते. बालविकास शाळेमध्ये खिचडी वाटपाचे कामही एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. या संस्थेने दिलेल्या खिचडीमधून शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. काळजीपूर्वक काम न करणार्‍या संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर यांनी सांगितले आहे.