Breaking News

मी चित्रपटातुन आणिबाणीवर बोललो तर काय चुकले? - मधुर भांडारकर

पुणे, दि. 07, नोव्हेंबर - आजपर्यंत अनेक वास्तवदर्शी चित्रपट केले, मात्र ’इंदु सरकार’ चित्रपटामुळे झालेला त्रास मी कधीच विसरणार नाही. ’आणिबाणी’वर यापूर्वी अनेक  पुस्तके आली, वर्तमानपत्रामध्ये लिखाण झाले, दुरदर्शनवर माहितीपट आले त्यांना कोणी काही बोलले नाही. मी चित्रपटातुन आणिबाणीवर बोललो तर काय चुकले? असा सवाल  उपस्थित करत चित्रपट आणि कलाकारांनाच कायम लक्ष्य का केले जाते अशी खंत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केली. 
सदाशिव अमरापुरकर मेमोरिअल ट्रस्टतर्फे आयोजित ’दिग्दर्शकाच्या नजरेतुन’ या रीमा अमरापुरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत भांडारकर बोलत होते.
भांडारकर म्हणाले, व्हिडिओ कॅसेट विक्री करत असताना नेहमी वाटायचे की मी यात काही तरी करू शकतो, त्याप्रमाणे काही लोकांना याबद्दल विचारपुस करत होतो, काही लोकांनी  सल्ला दिला की पुण्यात येवून फिल्म इंस्टिट्युट मध्ये प्रवेश घे, मात्र तिथं गेल्यावर कळाल की, इथ शिकण्यासाठी पदवी लागती मात्र मी तर सहावी पर्यंतच शिकलो होतो. मात्र  त्यानंतर मी दिग्दर्शकांन कडे साह्ययक म्हणुन काम पाहू लागलो. सदाशिव अमरापूकर यांनी सर्वांत पहिल्यांदा माझ्या उज्वल भविष्य असणार असा विश्‍वास दाखविला. पहिलाच  चित्रपट त्रिशक्ती आपटला. तरिही त्यांनी तु चांगले काम करून शकतो असा विश्‍वास दाखवला. मला त्यावेळी अमरापूर म्हणाले होते की, तुला एखादी चांगली संहिता मिळाली तर तुझे  चांगले नाव होईल असे सांगितले. तसेच झाले चांदणी बार ला मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यापूर्वी केलेल्या चित्रटाची मागणी होवू लागली असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ते  म्हणाले की, एखाद्या विषयावर संशोधन करून मला चित्रपट बनवायला आवडते. व मी तेच करतो. यामुळे मानवी भावविश्‍वातील जग कळायला मदत होते.
विनोद तावडे म्हणाले, अमरापुरकर हे फक्त कलावंत नव्हते, तर संवेदनशील माणुसही होते. ज्या गावात जात, तेथील प्रश्‍न जाणुन घेत ते सरकारपर्यन्त पोहोचवुन ते सोडवित होते.  त्यांच्या नावाच्या ट्रस्टचा मी विश्‍वस्त आहे, याचे मी माझे भाग्य समजतो.’