"छगन भुजबळ ही लढवय्या व्यक्ती आहे, ते बाहेर आले पाहिजेत."
ज्या कलमाअंतर्गत छगन भुजबळांना जामीन मिळत नाहीये. ती कलम सुप्रीम कोर्टाने रद्द केलीये. त्यामुळे भुजबळांचा जामिनाचा मार्ग जवळपास मोकळा झालाय. ते बाहेर आले पाहिजे, त्यांची खरी गरज आहे. ते बाहेर यावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हे वक्तव्य मी जाणीवपूर्वक करत आहे असं दिलीप कांबळे म्हणाले. तसंच छगन भुजबळ ही लढवय्या व्यक्ती आहे. त्यांनी समाजासाठी मोठा लढा दिलाय असंही कांबळे म्हणाले.
