Breaking News

गुरव समाजाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर -  गुरव समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आहेत. वेळोवेळी त्याबाबत निवेदन देण्यात आली परंतु त्यावर शासनाच्यावतीने कोणत्याही  प्रकारची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आज पुन्हा राज्यात गुरव समाजाच्यावतीने एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. 
याप्रसंगी नगर जिल्हा गुरुव समाज सेवाभावी संस्थेच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे  निदर्शने करुन उपजिल्हाधिकारी वामन कदम यांना  निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष अनिल तोरडमल, उपाध्यक्ष योगेश वाघ, सचिव महेश शिर्के, सुरेश थोरात, शिवाजी शेलार, प्रशांत शेलार, सचिन रेणुकर, गणेश शिंदे, अरविंद  आचार्य, बाळासाहेब गुरव,शिवनाथ शिंदे, सुरेखा तोरडमल, स्मीता शेलार, सुवर्णा जावळे,निलिमा धुमाळ आदिंसह समाज बंधू-भगिनी मोठ्यासंखेने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, देवस्थान इनाम वर्ग - 3 चे तवन खालसा करणे, जमीनीचा फेर सर्व्हे करणे, बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी मूळ  सनद धारकांच्या ताब्यात देणे, इतर हक्कातील नाव काढून गुरवांची नावे कबजेदार सदरी लावणे, देवस्थान जमिनीला लावलेले बेकायदेशीर कूळ काढून टाकणे, त्या जमिनी मूळ सद  धारकांच्या ताब्यात देणे, सार्वजनिक कामांसाठी घेतलेल्या जमिनी चालू बाजार भावांप्रमाणे योग्य तो मोबदला शासनाने द्यावा. तसेच सर्व ट्रस्टमध्ये गुरवांना 50 टक्के विश्‍वस्त व पदा धिकारी म्हणून घ्यावे, पुजेचा, धधार्मिक विधीचा व उत्पन्नाचा वंश परंपरागत हक्क कायम ठेवणे, शैक्षणिक शिष्यवृत्त देणे, वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करुन देणे, निवृत्ती वेतन, शेती  विषयक कर्ज पुरवठा, ओबीसींचे दाखल, समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे, समाजावर होत असलेले हल्लेकर्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा अ‍ॅक्ट सारखा कायदा करण्यात यावा, आदि  मागण्या निवेदनात द्वारे केल्या आहेत.
याप्रसंगी विनायक धुमाळ, पंकज काळे, रामकृष्ण क्षीरसागर, कैलास मल्लनाथ, सुनिल पवार, आदिनाथ शिंदे, सागर शिंदे, बाळासाहेब चौधरी, सचिन घोडके, बाळासाहेब घोडके,  संजय घोडके, रमेश क्षीरसागर, बाबासाहेब जाधव, सदाशिव जाधव, नितीन जाधव, गंगाधर पतने, रामनाथ जाधव, दत्तात्रय मल्लनाथ, ज्ञानेश्‍वर केदारी, नाना पांडे आदी उपस्थित  होते.