Breaking News

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत

नांदेड, दि. 12, ऑक्टोबर - आज दुपारी दोनपर्यंत नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत 81 पैकी 57 जागांवर कॉग्रेसने विजय मिळवला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नांदेड  महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने स्पष्टपणे काँग्रेसला बहुमत दिले असून हे मतदान पक्षीय आरोप प्र्रत्यारोपाच्या पलिकडे जावून चव्हाण कुटुंंबियांच्या नांदेडकरांशी पिढयानपिढया असलेल्या  नात्यालाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
आज सकाळी शासकीय तंत्रनिकेतनात मतमोजणीला सुरूवात झाली निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख हे जातीने तिथे हजर होते. पोस्टल बॅलेटनंतर 20 प्रभागातील 81 जागांसाठी  मतमोजणी सुरू झाली. मतमोजणी पहिल्या आर्ध्या तासात 18 जागांचे कल बाहेर आले होते. काँग्रेसला 10 जागांवर आघाडी तर भाजपाला 8 जागांवर आघाडी होती. सुरूवातीला  हैदरबाग भागातील निकाल पुढे आले पहिला निकाल:काँग्रेसच्या बाजुने आला .शेरअली (काँग्रेस) 5537 विजयी झाले तर पराभूत प्रतिस्पर्धी एमआयएमचे बासिद यांना 2418मते पडली.  त्यानंतर काँग्रेसचे रजिया बेगम बाबू, मसूद खान, आसिया बेगम हबीब हेहि विजयी झाले. शिवाजी नगर प्रभाग ब- काँग्रेसच्या मोहिनी येवनकर विजयी झाल्या तर दुपारी बाराच्या दरम्यान  भाजपाने खाते उघडले. कौठा प्रभागातून भाजाच्या शांता गोरे या विजयी झाल्या. भाग्यनगर भागात फारुख अली खान, महेंद्र पिंपळे, जयश्री पावडे विजयी,अपर्णा नेरलकर विजयी झाले  .दुपारी एकपर्यंत काँग्रेसी सदोतीस जागांवर आघाडी होती तेव्हाच कॉग्रेस निर्विवाद बहुमत मिळवणार हे सिध्द झाले होते. आता संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर फक्त यावर शिक्कामोहर्तब  झाला आहे. या निविडणुकीत कॉग्रेसचे 81 ,भाजपचे 80 तर शिवसेनेच्या 63 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. एकूण साठ टक्के मतदान झाले होते. तर नोटांचा अधिकारही सात  हजारपेक्षा अधिक लोकांनी वापरला होता. दुपारी दोनपर्यंत कॉग्रेलची 45 जागांवर आघाडी होती.
या निवडणुकीत अपेक्षे प्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आपला बालेकिल्ला राखण्यात यशस्वी झाले आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये एमआयएम कडे वळलेला कॉग्रेसचा मतदार  स्वगृहि परतला असून मराठवाडयात एमआयएमला भवितव्य नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. एकेकाळी कॉग्रेसच्या प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेचे तीन तेरा वाजले आहेत तर मुळात  नांदेडमध्ये फाससे अस्तित्व नसलेल्या भाजपलाही जनतेने नाकारले आहे.
चव्हाणांचे कुटंबियांचे यश
विधानसभांपासून ते ग्रामपंचायती निवडणुका किंवा छोटया मोठया पोटनिवडणुकांत भाजप आघाडीवर असताना नांदेडमध्ये कॉग्रेस विजयी कशी असा प्रश्‍न या निवडणुकांकडे दुरून पाहणा- यांना पडू शकतो पण याचे यश माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांज्या पासून ते अशोक चव्हाण ,अमिता चव्हाण यांच्या परंपरागत जनसंपर्काचे,आणि केलेल्या कामाचे आहे. व्यापारी  महासंघ,शिक्षण संस्था,गुरूव्दारासारख्या धार्मिक संस्थां किंवा लिंगायत ,कोमटी समाजासारख्या संघटना असो यांच्या छोटया मोठया समस्यांकडे दोघांही चव्हानांनी जातीने लक्ष दिले आहे,  राज्याचा कारभार सांभाळताना या पितापुत्रांनी त्यांचा बेस असलेल्या नांदेडच्या जनतेकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. छोटया दुकानदारानं जरचव्हाणांना उदघाटनासाठी बोलावले तर ते त्याच्या  भावना समजून घेवून आवश्य भेट दयायचे. नांदेड मधील प्रत्येक कुंंटुंबाशी कोणत्या न कोणत्या माध्यमातून ते पिढया व पिढया संपर्कात राहिले. वातावरण कसंहि असो आपला बालेकिल्ला  कसा राखता आला पाहिजे यांचे प्रात्याक्षिक म्हणजे नांदेडची निवडणूक आहे अशा प्रतिक्रीया येत आहे .या विरूध्द भाजप आणि शिवसेनेने खरा प्रतिस्पर्धी बाजुला ठेवून एकमेकांवरच  आरोप प्रत्यारोप केले. स्थनिक निवडणुकीतही शिवसेनेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदीवर टीका करण्याचे सोडले नाही.या पक्षांनी वस्तुस्थिती लक्षात घेवून एकत्र निवडणूक लढवली असती तर  निदान काही जागा जास्त निवडून आल्या असत्या अशाही प्रतिक्रीया येत आहेत. भाजपने प्रचाराचा धडाका भाजपने प्रचाराचा धडाका लावला होता तरी भाजपच्या तिकीटावर लढणारे अनेक  नगरसेवक व कार्यकर्ते हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे होते त्यांची स्थिती या निवडणूकीत घर का ना घाट का अशी झाली होती.