Breaking News

शेतकरी कर्जमाफीचे पैठणमध्ये फटाके फोडून स्वागत

औंरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयाच्या शेतकर्‍यांच्या केलेल्या कर्जमाफीबद्दल पैठण तालुका  व शहर भाजपाच्या वतीने मंगळवारी फटाके फोडून व मिठाई वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवाजी चौकात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडीने केले  होते. नगराध्यक्ष सुरज लोळगे, नगरसेवक आबासाहेब बरकसे, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रेखाताई कुलकर्णी, उपनगराध्यक्षा सुचित्रा महेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली या क र्जमाफीचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाच महिलांनी भाजप पदाधिकार्‍यांचे औक्षण केले. त्यांनी महिला भगिनींना पैठणी साडी देऊन भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी  बोलतांना तुषार शिसोदे म्हणाले की, राज्य शासनाने शेतकर्‍यांना दिवाळीत भेट दिली असुन लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यावर बुधवार पासुन रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.  यावेळी भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा नम्रता पटेल, नगरसेविका सविता माने, शोभाताई लोळगे, माजी नगरसेविका अर्चना गव्हाणे, सुनिता बरकसे, गिता पटेल, जयश्री बोंबले,  शहराध्यक्ष विजय चाटुपळे, महेश जोशी, शहर उपाध्यक्ष संतोष गव्हाणे, आशिष मापारी, सतिष आहेर, बाळु माने, गणेश मडके, अंबेकर दाजी, रुपेश जोशी, श्रीकृष्ण कुलकर्णी, रमेश  पाठक, वैभव पोहेकर, प्रशांत आव्हाड, गणी बागवान आदी उपस्थित होते.