Breaking News

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 19, ऑक्टोबर - दीपावलीनिमित्त अवतरणारे प्रकाशपर्व समाजमनासाठी चैतन्याचा स्रोत असून या पर्वाने यंदा राज्यातील सर्व नागरिकांना आनंद आणि सुख-समृद्धी  प्रदानकरावी, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ऐतिहासिक कर्जमाफीच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या जीवनातयंदाचा  दीपोत्सव नवा प्रकाश पसरवणारा ठरला आहे, असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दीपावलीपासून सुरू होणार्‍या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणतात, विविध क्षेत्रातील  क्रांतिकारक निर्णयांमुळे राज्यात परिवर्तन घडत आहे. राज्यात पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होत असून देशातील सर्वात जास्त गुंतवणूकही झाली आहे. विविध योजनांच्या  माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून नव्या महाराष्ट्राच्या निर्माणाकडे दमदार वाटचाल सुरू झाली आहे. या प्रक्रियेत  राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. या नवनिर्माणाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.