Breaking News

बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन

सातारा, दि. 17, ऑक्टोबर - विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ  आज सोमवारी सातारा येथे आंदोलन करण्यात आले . या अनोख्या आंदोलनात बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी झाले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत  आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.
या आंदोलनातपलि भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे सदस्य धनाजी शिंदे , पै. आनंदराव मोहिते, उदय पाटील, नाथाजी गरुड, पोपट गायकवाड, पै. रफिक इनामदार,  विवेक पाटील आदींसह सातारा जिल्हयातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी या आंदोलनात बाबात बोलताना धनाजी शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतींसदर्भांत मोठे बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे. यास हजारो बैलगाडी  चालक-मालक आपल्या बैलांसह उपस्थित आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातारा-सांगली जिल्ह्यांसह राज्यभरातून बैलगाडी चालक-मालक व शेतकरी मोठ्या संख्येने  सहभागी झालेयाचा अतिशय अभिमान वाटतो..
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. अगदी दिवाळी आंदोलनस्थळी करावी लागली तरी चालेल. शासनाकडून मागण्या मान्य क रण्यासंदर्भात पुढाकार घेतला जात आहे. मात्र, प्राणीमित्र याला विरोध करण्याचे काम करीत आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील दोनशेहून अधिक बैलगाड्या चालक-मालक हे  आपल्या बैलांसह यामध्ये सहभागी झाले . चार वर्षे झाली शर्यतींसाठी लढत आहोत. आता कोणत्याही परिस्थिती मागे हटणार नाही. जोपर्यंत प्राणीमित्र संघटनेवर बंदी घातली जात  नाही. आणि शर्यती सुरू केल्या जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.