शेतकर्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे वितरित
औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार आज जिल्ह्यातील 21 शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे पालक मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. पैठण तालुक्यातील सहा, गंगापूर 2, वैजापूर 1, फुलंब्री 6, औरंगाबाद 3, सिल्लोड 9 अशा 21 शेतकरी कुटुंबियांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देण्यात आली. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्जमुक्ती झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.