Breaking News

नागपूरला आज पाचवा एकदिवसीय सामना

नागपूर - दि. 01, ऑक्टोबर - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतला अखेरचा सामना नागपुरात खेळवला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत अगोदरच 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे शेवटचा सामना नावावर करुन ऑस्ट्रेलियाला आणखी एका पराभवाचा धक्का देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल. भारताचा पराभव करुन आतापर्यंतचा सर्वात मोठा मालिका विजय रोखण्याचा ऑस्ट्रेलियाचाही प्रयत्न असेल. कारण भारताने अखेरच्या वन डेत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने विजय मिळवल्याची ही पहिलीच वेळ असेल.
यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची मालिका झाली. यामध्ये भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियावर 3-2 ने मात केली. भारताने पहिल्यांदा 1986 आणि दुसर्‍यांदा 2013 साली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. अखेरचा वन डे जिंकून ऑस्ट्रेलियाकडून 4-1 ने झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधीही भारतीय संघाकडे आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारताचा दारुण पराभव झाला होता. या विजयानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वन डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान होईल.