Breaking News

तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

लातूर, दि. 14, सप्टेंबर - विज्ञानाची पायाभूत परिक्षा देवून शाळेतून परतत असताना तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
लातुर येथील नांदेड रस्त्यावरील यशवंत विद्यालयातील सुमीत दयानंद खंडागळे (वय 13, रा. बरकतनगर) व बालाजी सहदेव डोंगरे (वय 14 रा. विठ्ठलनगर) या  दोघांनीही मंगळवारची पायाभूत चाचणी परिक्षा दिली. त्यानंतर हे दोघे शाळेतून घरी आलेच नाहीत. रात्रभर पालकांनी शोध घेतला. बुधवारी सकाळी सारोळा तलावात  दोघांचेही मृतदेह तरंगताना दिसले. मुलांचे दप्तर तलावाच्या शेजारीच आढळून आले आहे. मंगळवारी घरी जाता जाता पोहण्यासाठी ते सारोळा येथील तलावावर गेले  असावेत.