राणेंना भाजपने प्रवेश देऊ नये - अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर
मुंबई / जालना, दि. 24, सप्टेंबर - नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याला भारतीय जनता पक्षाने प्रवेश देऊ नये असे स्पष्ट मत शिवसेनेचे नेते आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले . जालना येथे पत्रकारांशी बोलताना केसरकर म्हणाले की , राणे यांच्यासारख्या अपप्रवृत्तीच्या नेत्याला भाजपने पावन करून घेतले तर भाजपची प्रतिमा मलीन होईल. राणे यांना पैशाची मस्ती आहे. पैशाच्या बळावर आपण काहीही करू शकतो असे त्यांना वाटते . त्यांची ही गुर्मी मतदारच उतरवू शकतात.
कोकणातील मतदारांनी राणे यांनी व त्यांच्या मुलाला पराभूत करून झटका दिला आहे . मुंबईतही त्यांना पराभूत व्हावे लागले . मात्र या अपयशातून ते आणि त्यांचे पुत्र काहीच शिकलेले दिसत नाहीत , असेही केसरकर म्हणाले .
ते म्हणाले की , भारतीय जनता पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे . मित्र पक्ष या नात्याने माझा भाजप ला सल्ला आहे की त्यांनी राणेंसारख्या अपप्रवृत्तींना थारा देऊ नये.
राणेंचे पुत्र आणि कार्यकर्त्यांच्या अरेरावीला कंटाळून कोंकणातील जनतेने राणे यांना हद्दपार केले आहे. लोकप्रतिनिधींना अवमानास्पद भाषेत बोलणे राणे आणि त्यांच्या मुलांची खासियत आहे . विरोधकांचा आदर करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे . त्यामुळेच अशा प्रवृत्तींना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नये असेही केसरकर यांनी नमूद केले .
राणे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावून केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला.
कोकणातील मतदारांनी राणे यांनी व त्यांच्या मुलाला पराभूत करून झटका दिला आहे . मुंबईतही त्यांना पराभूत व्हावे लागले . मात्र या अपयशातून ते आणि त्यांचे पुत्र काहीच शिकलेले दिसत नाहीत , असेही केसरकर म्हणाले .
ते म्हणाले की , भारतीय जनता पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे . मित्र पक्ष या नात्याने माझा भाजप ला सल्ला आहे की त्यांनी राणेंसारख्या अपप्रवृत्तींना थारा देऊ नये.
राणेंचे पुत्र आणि कार्यकर्त्यांच्या अरेरावीला कंटाळून कोंकणातील जनतेने राणे यांना हद्दपार केले आहे. लोकप्रतिनिधींना अवमानास्पद भाषेत बोलणे राणे आणि त्यांच्या मुलांची खासियत आहे . विरोधकांचा आदर करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे . त्यामुळेच अशा प्रवृत्तींना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नये असेही केसरकर यांनी नमूद केले .
राणे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकावून केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला.