Breaking News

पुरंदरमध्ये दोन अपघातात 5 जणांचा मृत्यू

पुणे, दि. 13, सप्टेंबर - अरुंद पुलावर टेम्पो व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन लहान मुलींचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा  अपघात पुरंदर तालुक्यातील सासवड - जेजुरी महामार्गावर खळद गावच्या हद्दीत झाला. या अपघातात काजल प्रकाश जाधव ( वय 3 वर्षे ), अर्चना प्रकाश जाधव  ( वय 2 वर्षे ) या सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई लक्ष्मी प्रकाश जाधव, वडील प्रकाश लक्ष्मण जाधव, भाऊ रोहन प्रकाश जाधव, बहीण वैशाली प्रकाश  जाधव ( सर्व रा. राजेटाकळी, ता. घनसांगवी, जि. जालना सध्या रा. निमगाव पाटी, अकलूज, सोलापूर ) हे गंभीर जखमी झाले आहेत. खड्डा चुकवताना हा  अपघात झाल्याचे बोलले जात आहे.तर दुसरा अपघात नीरा, (ता. पुरंदर) येथे झाला. ट्रेलरला दुचाकी ओव्हरटेक करत असताना अपघात होऊन एकाच कुटुंबातील  तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये निलम गोपीनाथ बरकडे (वय 28 वर्षे), ओम गोपीनाथ बरकडे ( वय साडेतीन वर्षे ), पार्थ गोपीनाथ बरकडे ( वय दीड वर्षे ) सर्व रा.  पिसुर्डी, ता. पुरंदर यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोपीनाथ बरकडे व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण दुचाकीवरुन नीरा येथे जात होते तर अवजड  वाहतूक करणारा ट्रेलर नीराकडून जेजुरीकडे जात होता.