Breaking News

काश्मीरशिवाय भारत अपूर्ण -माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - जम्मू-काश्मीरशिवाय भारत अपूर्ण आहे, असे प्रतिपादन माजी परराष्ट्र मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी केले. येथे  आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादात ते बोलत होते .1947 च्या फाळणीनंतर पुन्हा देशाचे विभाजन होणे शक्य नाही,असेही ते म्हणाले. 
पाकिस्तानला काश्मीर हवे आहे . त्यांना काय वाटते याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही . काश्मीरशिवाय आम्ही अपूर्ण आहोत अशी आमची भावना आहे .  पाकिस्तानचे पत्रकार भेटल्यावर मी त्यांना हीच गोष्ट सांगतो . काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे . काश्मीर वेगळा केला तर भारताची संकल्पना अपूर्णच  राहिल,असेही खुर्शीद म्हणाले.