Breaking News

पूर्ववैमनस्यातून सहा जणांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण


औरंगाबाद, दि.30 : जुन्या वादातून भाडोत्री गुंडाच्या टोळीकडून एका कुटुंबातील पाच ते सहा जणांना बेशुद्ध होइपर्यंत बेदम मारहाण करण्याचा थरारक प्रकार बाभुळगावगंगा येथे रविवारी रात्री घडला. आजूबाजूचे लोक मदतीला धावून आल्यामुळे गुंडाच्या टोळी फरार झाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सहा जणांवर खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात 11 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुरणगाव येथील अनिल साबाजी वाघ याची बाभुळगावगंगा शिवारात शेतजमीन आहे.त्याठिकाणी वस्तीवर कुटुंबियांसह वास्तव्यास आहे.त्याचे धर्मराज ठोबरे यांच्याशी शेतजमिनीचा जुना वाद आहे.यवादातून रविवारी रात्री आठ वाजे दरम्यान धर्मराज ठोंबरे, अभिमन्यू ठोंबरे,रा.पुरणगाव तसेच पप्पू कैलास बनसोडे, बापू बनसोडे,रा.भामाठाण ता.श्रीरामपूर यांनी भाडोत्री गुंडाच्या टोळी आणून अनिल वाघ त्यांचे कुटुंबातील दिपक वाघ, संदीप वाघ, संजय वाघ, अनिता वाघ तू आमच्या शेतातून मोटर चालू करण्यास का जातो असे म्हणून गज, काठीने मारहाण करून अनिल सबाजी वाघ, संजय सयाजी वाघ, सदिप वाघ, दिपक वाघ, अनिता वाघ यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करून जखमी केले. वस्तीवरील महिलांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूला राहणा-या नागरिकांना वस्तीवर दरोडेखोर आल्याचे समजून नागरिकाचा मोठा जमाव त्याच्या वस्तीकडे येत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुंड फरार झाले.जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीना नागरिकांना वैजापूरला उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी अनिल सबाजी वाघ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन धर्मराज रावसाहेब ठोंबरे, अभिमन्यु रावसाहेब ठोंबरे, पपु कैलास बनसोड़े, बापु कैलास बनसोड़े अन्य अनोळखी सात जणांविरूध्द वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार बादलसिगं कवाल हे करीत आहेत.