Breaking News

उपराष्ट्रपतीपदाचा सन्मान कायम ठेवण्यासाठी कटीबद्ध - नायडू

नवी दिल्ली, दि. 08, ऑगस्ट - उपराष्ट्रपतीपदाचा सन्मान कायम ठेवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिवादन नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी आज  केले. माझ्यासारखा अतिशय सामान्य कुटुंबातील माणूस उपराष्ट्रपती होतो हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे . त्यामुळे या पदाचा सन्मान मी कायम राखीन असे  ते म्हणाले. 
पक्षीय राजकारणाला बाजूला ठेवत विविध पक्षातल्या अनेक संसद सदस्यांनी मला पाठिंबा दिला. त्यांच्या प्रति माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असल्याचे ते म्हणाले.  आता मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नाही. मी मंत्रिमंडळाचा, पक्षातील पदाचा राजीनामा दिला असून लवकरच संसद सदस्यपदाचाही राजीनामा देणार  असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता व सर्वपक्षियांचे प्रेम, आपुलकी आणि नरेंद्र मोदी यांनी दाखवलेला विश्‍वास यामुळेच माझी निवड होऊ शकली, अशी  भावना त्यांनी व्यक्त केली.