Breaking News

बिहारमधील पूर नितीश कुमारांनीच आणला - लालू प्रसाद

पाटणा, दि. 27, ऑगस्ट - बिहारमध्ये आलेला पूर हा मानव निर्मित असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या अभियंत्यांमार्फत पूरस्थिती निर्माण केली असा  आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी आज येथे केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की , नितीश कुमार यांच्या  अभियंत्यांनी मुद्दामहून धरणात काही तरी गडबड केली आणि राज्यात पूर स्थिती निर्माण केली.
या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली . या पूर्वी राज्यात पूर आला होता त्यावेळी पंतप्रधानांनी बिहारला एक पैसाही दिला नव्हता . आता मात्र  बिहारला 500 कोटींची मदत दिली जात आहे , असे लालूप्रसाद म्हणाले.