Breaking News

बळी देण्यासाठी अपहरण केलेल्या मुलाची सुटका

जालना, दि. 09 - घातपाताच्या हेतूने आपले अपहरण करून आपल्याला बंद खोलीत ठेवल्याची तक्रार एका चौदा वर्षाच्या मुलाने जालना पोलीस ठाण्यात केली  आहे. कबाडी मोहल्ला भागात राहणारा राहणा-या शेख अमीर अब्दुल सत्तार (14) हा रविवारी सायंकाळी चंदनझि-याकडे जाण्यासाठी सिंधीबाजार परिसरात आला  होता नंतर काय झाले त्याला कळले नाही एकदीड तासानंतर जाग आल्यानंतर आपण एका खोलीत बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. लांब केस, सडपातळ बांधा,  गळ्यात माळा असलेल्या व्यक्तीने आपल्या तोंडाळा काळे लावले.तो थोडा वेळ बाहेर गेल्यानंतर एक माणूस तिथे आला. त्याने आपले हात सोडून पळून जाण्यास  सांगितले. असे त्याने पोलिसांना सांगितले .खुप वेळ पळाल्यांनर तो रामतीर्थ पूलावर आला. तेथून घरी आला नातेवाईकांबरोबर येऊन त्याने पोलिसात आपल्याच  अपहरणाची तक्रार दिली. सदर अपहरण बळी देण्याच्या हेतूने केले होते की काय याचा तपास पोलिस करत आहेत.