Breaking News

धोनी - भुवनेश्‍वरची चिवट फलंदाजी; भारताचा श्रीलंकेवर 3 गडी राखून विजय

पल्लेकल, दि, 25, ऑगस्ट - भारताने श्रीलंकेवर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. पावसामुळे भारताला 47 षटकांत 231 धावांचे  लक्ष्य देण्यात आले होते. हे आव्हान भारताने 43.2 षटकांत पूर्ण केले. भारताचे सलामीवीर आणि मधली फळी आव्हानाचा पाठलाग करताना झटपट बाद झाले.  त्यामुळे एक वेळी भारताची अवस्था 7 बाद 131 अशी झाली होती. पण भुवनेश्‍वर कुमार (53) आणि महेंद्रसिंग धोनी (45) यांनी अतिशय चिवट खेळ करत नाबाद  शतकी भागीदारी केली आणि भारताला सामना जिंकवून दिला. फिरकीपटू अकिला धनंजय याने 6 बळी टिपले. या विजयामुळे भारतामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी  आघाडी घेतली आहे.