Breaking News

काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात गरिबांसाठी केवळ अश्रू ढाळले - धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - सत्तेवर असणा-यांनी कामे करायची असतात. काँग्रेसने मात्र आपल्या सत्ताकाळात गरिबांसाठी केवळ अश्रू ढाळले, अशी टीका केंद्रीय  पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आपल्याकडे एक गृहस्थ आहेत जे अधून-मधून भारताला भेट देत असतात. उरलेला वेळ परदेशातील आजीच्या  घरी घालवतात. ते जेव्हा भारतात येतात तेव्हा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे पुरावे मागतात. अशांना माझे एकच सांगणे आहे की, मोदी सरकार  देशवासियांसाठी हितकारक योजना राबवल्या आहेत. आम्ही अनुसूचित जाती-जमाती बांधवांसाठी सहा हजार पेट्रोलपंपांचे वाटप करण्यात आले. येत्या काळात ही  संख्या 12 हजाराच्या घरात जाऊ शकते, असेही ते म्हणाले.