Breaking News

नगराध्यक्षा पाठोपाठ उपनगराध्यक्षावरही अविश्‍वास ठराव

अहमदनगर, दि. 20 - जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा मेहरूनिसा कुरेशी यांच्या  विरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे तसेच नगराध्यक्षा प्रिती विकास राळेभात यांनी सादर केलेला राजीनामा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केला आहे.
जिल्हाधिकारी यांना उपनगराध्यक्षा विरोधात दिलेल्या अविश्‍वास ठरावाच्या पत्रात म्हटले आहे की 2015-2016 मध्ये नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर  निवडणून आलेल्या आम्ही नगरसेवकांनी प्रिती नगरसेवक प्रिती विकास राळेभात यांची नगराध्यक्षा तर मेहरूनिसा कुरेशी यांची उपनगराध्यक्ष म्हणून मोठ्या विश्‍वासाने निवड केली होती परंतु नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे नगरपरिषदेची प्रतिमा मलीन झाली आहे त्याला उपनगराध्यक्षा ही तितक्याच जवाबदार आहेत उपनगराध्यक्षांनी कोणतेही कामात हस्तक्षेप न करता नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराला अप्रत्यक्षपणे पाठींबाच दिला आहे.
कोणत्याही निर्णयात नगरसेवकांना विश्‍वासात न घेता मनमानीपणे निर्णय घेतले गेले
नागरिकांना समस्या ऐकून घेण्यास वेळ देत नाहीत.  नगरपरिषदेच्या वित्तीय  व कार्यकारी प्रशासनावर कसलेही नियंत्रण नाही.  नगरसेवकांसह नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात अशा अनेक गंभीर गोष्टीमुळे आमचा निष्क्रिय उपनगराध्यक्षांवर विश्‍वास राहिलेला नसून नगरपरिषदेची यंत्रणा पुर्णपणे ढासळली आहे यामुळे सदर उपनगराध्यक्षांना उपनगराध्यक्षपदावरून काढून टाकणे कायद्याच्या व न्यायाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे व आवश्यक झालेले आहे.
त्यानुसार प्रिती विकास राळेभात व उपनगराध्यक्ष कुरेशी यांना पदावरून काढण्यासाठी विशेष सभा बोलविण्यासाठी आम्ही  17 नगरसेवक ओळख पटवून सह्यानिशी जिल्हाधिकारी यांना मागणी पत्र सादर करत आहोत.
सदर पत्रावर नगरसेविका वैशाली झेंडे,  सूमन शेळके, सुरेखा राळेभात, विद्या वाव्हळ, लता गायकवाड, राजश्री पवार, फरिदा खान, आर्चना राळेभात, नगरसेवक महेश निमोणकर, निखील घायतडक, शामीर सय्यद, गूलचंद अंधारे, संदिप गायकवाड, अमित चिंतामणी, ऋषिकेश  बांबरसे, गणेश आजबे,  बिभीषण धनवडे, या 47 नगरसेवकांच्या सह्या आहेत.
यापूर्वी नगराध्यक्षांच्या विरोधात दोन वेळा अविश्‍वास ठराव आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला तेव्हा 16 नगरसेवक सहलीवर रवाना झाले होते परंतु त्यावेळी हेच उपनगराध्यक्षांनी शब्द फिरवला व ऐन वेळी  म्हणून  आले नाही. केवळ मेहरूनिसा कुरेशी या न आल्याने अविश्‍वास ठराव बारगळला होता असा प्रकार पून्हा घडू नये म्हणून सतर्कता बाळगत सहलीला जाण्यापूर्वी 17 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ओळख पटवून सह्यानिशी अविश्‍वास ठराव दाखल केला आहे  त्यामुळे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष बदलाच्या कामाला वेग आला असून कोण कोण होणार याची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.