Breaking News

सिक्कीमच्या मुद्यावर चीनची आक्रमकता अनावश्यक - एस. जयशंकर

नवी दिल्ली, दि. 20, जुलै - सीमारेषेजवळ सिक्कीमच्या मुद्यावर चीनची आक्रमकता अनावश्यक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.  या मुद्यावर दोन्ही बाजूंकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहेत असे जयशंकर म्हणाले.
संसदेच्या स्थायी समितीतील परराष्ट्र व्यवहार विषयाचे प्रमुख खा. शशी थरूर यांना भारत-चीन या दोन देशांतील सद्यस्थितीची माहिती दिली. या समितीत काँग्रेसचे  उपाध्यक्ष राहुल गांधी हेही सदस्य आहेत. या वेळी सिक्कीमच्या मुद्यावरील भूमिकेबाबत अनेक प्रश्‍न विचारण्यात आले.