गो रक्षणाच्या नावाखाली हिंसाचारात भाजप , संघ परिवारातील मंडळींचा सहभाग - आझाद
नवी दिल्ली, दि. 20, जुलै - गो रक्षणाच्या नावाखाली देशभर सुरु असलेल्या हिंसाचारात भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील मंडळी गुंतली आहेत असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी आज केला . राज्यसभेत या संदर्भातील चर्चेत बोलताना आझाद यांनी या हिंसाचाराला सताधारी भाजप आणि रा. स्व. संघाच्या परिवारातील संघटना जबादार असल्याचा थेट आरोप केला . ते म्हणाले की , जमावाने कायदा हातात घेऊन हिंसाचार करण्याच्या पूर्वीही घडल्या होत्या . मात्र अशा हिंसाचारात सत्ताधारी सहभागी झाल्याचे चित्र प्रथमच दिसत आहे. गो रक्षणाच्या नावाखाली हिंसाचार करणार्या मंडळींना सरकारी यंत्रणेकडून संरक्षण दिले जात आहे , असा आरोपही त्यांनी केला . या वेळी आझाद यांनी काश्मीर मध्ये जमावाकडून पोलीस अधिकार्याची ठेचून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचाही निषेध केला .
ते म्हणाले की , अशा हिंसक घटना माणुसकीला काळीमा फासणार्या आहेत . या वादाला धार्मिक रंग देऊ नका . त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील , असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की , अशा हिंसक घटना माणुसकीला काळीमा फासणार्या आहेत . या वादाला धार्मिक रंग देऊ नका . त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील , असा इशाराही त्यांनी दिला.