भारताला पाकिस्तानकडून नव्हे चीनकडून खरा धोका- मुलायम सिंग
नवी दिल्ली, दि. 20, जुलै - भारताला पाकिस्तानकडून नव्हे तर चीनकडून खरा धोका आहे . त्यामुळे आपण तिबेटच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊन मागच्या चुका सुधारल्या पाहिजेत , असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंग यादव यांनी आज लोकसभेत केले .
सिक्कीममधील तणावग्रस्त स्थितीच्या पार्श्वभारत सरकारकडून आत्तापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली, असा सवालही त्यांनी या वेळी केला . सिक्कीममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भुतानला आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. चीन हल्ल्याच्या तयारीत आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठीची तयारी आपण करत आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चीन भारताला आपला सर्वात मोठा शत्रु मानतो. भूतानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे.
आपल्यासाठी पाकिस्तानहून चीनच मोठा शत्रु आहे. तिबेट चीनच्या हाती जाऊ द्यायला नको होते. संपूर्ण देश दलाईलामा यांच्या पाठीशी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सिक्कीममधील तणावग्रस्त स्थितीच्या पार्श्वभारत सरकारकडून आत्तापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली, असा सवालही त्यांनी या वेळी केला . सिक्कीममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भुतानला आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. चीन हल्ल्याच्या तयारीत आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठीची तयारी आपण करत आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चीन भारताला आपला सर्वात मोठा शत्रु मानतो. भूतानची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे.
आपल्यासाठी पाकिस्तानहून चीनच मोठा शत्रु आहे. तिबेट चीनच्या हाती जाऊ द्यायला नको होते. संपूर्ण देश दलाईलामा यांच्या पाठीशी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.