कर्जमाफी पदरात पडत नाही तोपर्यंत आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवा -उद्धव ठाकरे
जालना, दि. 01 - प्रत्यक्ष कर्जमाफी पदरात पडत नाही तोपर्यंत शेतक-यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी, शिवसेना शतक-यांबरोबर आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले. शवसेनेने शेतक-यांची बाजू लावून धरल्याने राज्य सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले.असेही ते म्हणाले.
जालना तालुक्यातील रामनगर येथील साखर कारखाना परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, नेते डॉ. हिकमतराव उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, आदी उपस्थित होते संवाद दौरा कार्यक्रचा भाग म्हणून उध्दव ठाकरे यांचा हा दौरा होता.
जालना तालुक्यातील रामनगर येथील साखर कारखाना परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, नेते डॉ. हिकमतराव उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, आदी उपस्थित होते संवाद दौरा कार्यक्रचा भाग म्हणून उध्दव ठाकरे यांचा हा दौरा होता.