Breaking News

समाजाला पुढे नेण्यासाठी जाती प्रथा नष्ट केली पाहिजे - मीरा कुमार

नवी दिल्ली, दि. 28 - सध्या राष्ट्रपतीपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांबाबत दलित विरुद्ध दलित अशी लढाई असल्याचे दर्शवले जात आहे. मात्र समाजाला पुढे  नेण्यासाठी जाती प्रथा नष्ट केली पाहिजे, असे मत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या आधी राष्ट्रपतीपदाच्या  निवडणुकांमध्ये अनेकदा उच्च जातीचे उमेदवार उभे होते. पण तेव्हा कुणीही त्यांच्या जातीची चर्चा केली नाही, असेही मीरा कुमार म्हणाल्या.
गुजरातमधील साबरमती येथून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अभियानाला सुरुवात करणार असल्याचे मीरा कुमार यांनी सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे  रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहेत. त्या संदर्भात नितीश कुमार यांना पत्र पाठवले आहे. मला पाठिंबा द्यायचा की नाही हा पूर्णत: नितीश कुमार व त्यांच्या  पक्षाचा निर्णय आहे. राष्ट्रपतीपदासोबतच विचारधारेचीही लढाई लढत आहे. स्वातंत्र्य, गरिबी, लोकशाही व सामाजिक न्याय यांवर मी विश्‍वास ठेवते, असेही मीरा कुमार  म्हणाल्या.