भूस्खलनामुळे श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद; पर्यटक अडकले
जम्मू, दि. 30 - जम्मू-मधील रामबन आणि उधमपुर जिल्ह्यांमध्ये भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. येथील अनेक वाहने तेथे अडकली आहेत. वाहतूकही बंद करण्यात आली आहे. नाशरी, बाली नाला आणि पेंथियाल परिसरात होणा-या अतिवृष्टीमुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वाहने तेथे अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक पर्यटक येथे अडकले असल्याचे वृत्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिकमधील 70 यात्रेकरु अडकले असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे रामबन पेंथियाल परिसरात दोन ते तीन ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे 150 वाहन अडकले आहेत. रस्त्यावरील मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे रामबन पेंथियाल परिसरात दोन ते तीन ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे 150 वाहन अडकले आहेत. रस्त्यावरील मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.