Breaking News

छत्रपतींची लढाई मुस्लिमांच्या विरोधी होती असे म्हणणे चुकीचे - शरद पवार

पुणे, दि. 21 - छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला हे सत्य आहे. परंतु अफझल खान शत्रू होता म्हणून त्याचा कोथळा काढला, तो  मुसलमान होता म्हणून नाही. छत्रपतींची लढाई मुस्लिमांच्या विरोधी होती असे म्हणणं चुकीचे आहे.असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.ते  पुण्यात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज सचित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.ते पुढे म्हणाले, तेव्हा ज्ञान देण्याचे काम एका विशिष्ट समाजाकडे होते.  त्यामुळे त्यांच्या पद्धतीने इतिहास लिहिण्याच काम झाले आहे. वास्तविक पाहता इतिहास हा वास्तवतेच भान ठेवून लिहिला पाहिजे. चुकलेल्या व्यक्तीला शिक्षा देण्याचे  काम महाराजांनी केले आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो. तेव्हा ज्ञान काही लोकांनी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला आणि शिवाजी महाराजांचा संघर्ष  मुसलमाना पुरता मर्यादित ठेवला. महात्मा फुलेंनी, बाबासाहेबांनी सांगितलेले शिवाजी महाराज खरे आहेत. महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे महाराज हे सर्व कुळांचे  प्रतिपालक आहेत. त्यांच्या सैन्यात महत्वाच्या जागेवर सगळ्याच जातीचे लोक होते.