Breaking News

अतिवृष्टी, भूस्खलनामुळे थांबवण्यात आलेली अमरनाथ यात्रा सुरू

जम्मू, दि. 30 - जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आलेली पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे तिस-या  तुकडीला बाल्टाल-पहलगाम जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसाठी आज दुसरी तुकडी रवाना झाली. 
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सरू झाली होती. बुधवारपासूनच येथील परिसरात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे  डोंगरावरील माती सगळी रस्त्यावर येत आहे. यामुळे यात्रेकरुंना येथून प्रवास करणे कठीण झाले आहे. दरड कोसळल्यामुळे काल एका यात्रेकरुचा मृत्यू झाला  असल्याचे सांगण्यात येत आहे.