Breaking News

लक्ष्मणरेषा ओलांडलेल्या पाकिस्तानशी क्रिकेट मालिका नाही : क्रीडामंत्री


बीजिंग,दि.11 : दहशतवाद्यांना मदत करण्याची लक्ष्मणरेषा ओलांडलेल्या पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली जाणार नाही, असे मत आज क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले. चीन दौर्‍यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना आणि दहशतवादी कारवायांना सतत खतपाणी घातले जाते. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. मात्र आता पाकिस्तातने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांच्या या वागणुकीमुळे भारत-पाक क्रिकेट मालिका खेळण्यात येणार नाही, असा पुनरूच्चार गोयल यांनी केला. खेळ आणि दहशतवाद हे हातात हात घालून चालू शकत नाहीत, असे भारताने आधीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा संदेश पाकिस्तान सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. पाकिस्तानकडून सीमेपलीकडील
दहशतवाद आणि काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालणे जोपर्यंत थांबत नाही, तो पर्यंत क्रिकेट मालिका होणे अशक्य आहे, असे गोयल म्हणाले.