Breaking News

100 दिवसांतील कामगिरीबद्दल समाधानी - योगी आदित्यनाथ

लखनौ, दि. 28 - उत्तर प्रदेश सरकाला 100 दिवस पूर्ण झाले असून या कामगिरीमुळे सरकार समाधानी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  व्यक्त केली. 19 मार्च रोजी आमचे सरकार आले. कोणत्याही सरकारने इतक्या कमी कालाधीत इतके चांगले काम केले नाही, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यानाथ यांनी पत्रकार परिषद बोलावली. यावेळी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री  केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह मंत्रिमंडळांच्या काही मंत्र्यांची उपस्थिती होती.
केंद्र आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार काम करत आहे. ‘’सबका साथ - सबका विकास’’ या धोरणानुसार आमचे सरकार काम करत आहे.  विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला निवडून दिल्याबाबत आदित्यानाथ यांनी उत्तर प्रदेशमधील जनतेचे आभार  मानले. दरवर्षी 24 जानेवारी ’उत्तर प्रदेश दिन’म्हणून साजरा केला जाईल, अशी माहितीही आदित्यनाथ यांनी दिली.