Breaking News

राहुल गांधी यांच्या सहारनपूर दौ-यावर व्यंकय्या नायडू यांची टीका

नवी दिल्ली, दि. 28 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सहारनपूर दौ-याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री 
व्यंकय्या नायडू यांल यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी छायाचित्रांच्या बाबतीत संधीसाधू आहेत. ते कायम आपली छायाचित्रे काढून घेण्यासाठी तयार असतात. जिथे छायाचित्रे काढण्याच्या संधी दिसतात तिथे चतातच, अशी टीका नायडू यांनी केली आहे. सहारनपूरमध्ये काही दिवसांपासून होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी आज तेथे जाऊन पीडित कुटुंबाला भेट दिली. मात्र राहुल यांच्या दौ-याला संबंधीत अधिका-यांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आदित्य मिश्रा यांनी सर्व राजकीय नेत्यांना कायदा व सुव्यवस्था पुन्हा सुस्थितीत येईपर्यंत येथे दौरा न करण्याची विनंती केली होती.