‘आधी मंत्रिपदं सोडा आणि मग आम्हाला पाठिंबा द्या,’ शेतकर्यांनी शिवसेनेला सुनावलं!
नाशिक, दि. 16 - समृध्दी महामार्गाला विरोध करणार्या शेतकर्यांना समर्थन देण्यासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे गेले. पण त्यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ‘आधी मंत्रिपदं सोडा आणि मग आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या.’ अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली. नाशिकच्या शिवडे इथं हा प्रकार घडला. शेतकर्यांच्या आक्रमक प्रश्नांमुळे खासदार हेमंत गोडसे नि:शब्द झाले आणि त्यांनी आपलं भाषण आवरतं घेतलं.
गेला काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समुद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु आहे. शिवडे गावातील शेतकर्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या भागात आमदार आणि खासदार हे शिवसेनेचे आहेत. मात्र, यापैकी कुणीही अधिकार्यांशी चर्चा करायला आलं नसल्याचा दावा शेतकर्यांनी केला आहे. त्यामुळे आज शेतकर्यांची भेट घ्यायला आलेल्या खासदार गोडसे यांना शेतकर्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
गेला काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समुद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु आहे. शिवडे गावातील शेतकर्यांनी आंदोलन पुकारलं आहे. या भागात आमदार आणि खासदार हे शिवसेनेचे आहेत. मात्र, यापैकी कुणीही अधिकार्यांशी चर्चा करायला आलं नसल्याचा दावा शेतकर्यांनी केला आहे. त्यामुळे आज शेतकर्यांची भेट घ्यायला आलेल्या खासदार गोडसे यांना शेतकर्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.