Breaking News

दलित मुस्लीम ऐक्यामुळे राज्यात मोठी क्रांती निर्माण होईल- अ‍ॅड. आहेर

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 28 - दलित मुस्लीम ऐक्यामुळे राज्यात मोठी क्रांती निर्माण होईल असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राज्य उपाध्यक्ष व हाय कोर्टाचे नामवंत वकील अ‍ॅड. प्रकाश आहेर रांनी केले.
सोनगाव येथे सामाजिक समता मंचच्यावतीने दलित मुस्लीम मेळाव्याचे आयोजन करण्यातअ ाले होतेा. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अब्दुल हसन चौधरी होतेा.
यावेळी अ‍ॅड. प्रकाश आहेर म्हणाले, आज मुस्लीम समाजाने आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी आंदोलन, सघर्ष करण्यासाठी आपली भूमिका सोडून दिली आहे. तीन तलाकबाबत आज देशात चर्चा सुरु आहेत. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक धर्मियांना त्यांचे धार्मिक हक्क अबाधित रहावे म्हणून संवैधानिक हक्क दिले आहे. हा प्रश्‍न मुस्लीम समाजाची धार्मिक बाब आहे. त्यात सरकारने हस्तक्षेप करु नरे असेही ते म्हणाले.
अब्दुल  चौधरी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आज फेसीजियमचा मुकाबला करण्यासाठी देशातील सर्वच अल्पसंख्यांक समाजाने संघटीत होवून एक नवे राजकीय पर्व सुरु करावे. अहमदनगर जिल्ह्यातून त्यांची सुरवात व्हावी. यासाठी आम्ही आपल्याबरोबर राहून खंबीर साथ देऊ असेही ते म्हणाले.
यावेळी अ‍ॅड. संगीता आहेर, विनायक निकाळे, कमरुद्दीन मणिरार, संगमनेर एमआयएम अध्यक्ष शैख इरफान आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता मंचचे सरचिटणीस आयुब आदाम यांनी केले. याप्रसंगी बाबा शेख, जानी शेठ, राजू इंजिनिअर, शैख इद्रिस,दस्तागिर शहा, इनायत चौधरी, सुनिल ब्राम्हणे, एस. आर. ब्राम्हणे, बाळासाहेब पडघडमल, वसंतराव रामणे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार कॉ. बाबा शेख यांनी मानले.