काश्मिरी लोकांना दहशतवादीही मारतात आणि सैनिकही : दिग्विजय सिंह
नवी दिल्ली, दि. 16 - काश्मीरमध्ये सैन्य आणि स्थानिकांमधील वादात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका बाजूला काश्मिरी लोकांना दहशतवादी मारतात, तर दुसरीकडे सैन्य, असं वक्तव्य करत दिग्विजय सिंहांना नवा वाद ओढवून घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि स्थानिक लोकांमध्ये वाद सुरु आहे. याच वादातून सैन्यावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसंच सैन्यानं दगडफेक रोखण्यासाठी थेट स्थानिक तरुणाना जीपवर बांधल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर टीका करताना दिग्विजय सिंहांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि स्थानिक लोकांमध्ये वाद सुरु आहे. याच वादातून सैन्यावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसंच सैन्यानं दगडफेक रोखण्यासाठी थेट स्थानिक तरुणाना जीपवर बांधल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या काश्मीर धोरणावर टीका करताना दिग्विजय सिंहांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.