Breaking News

शेतकरी वडीलांच्या कर्जाला कंटाळून मुलाची आत्महत्या

अहमदनगर, दि. 23 -  तालुक्यातील धनेगाव येथील समीर लतीफ शेख या तरूणाने वडीलावर झालेल्या कर्जाला त्रासून व वडिलांच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली 
सदर घटना दि 21 एप्रिल रोजी सायंकाळी 9. वा उघडकीस आली शेजारच्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली याबाबत पोलिस पाटील आशोक गोकुळ चव्हाण यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली.सदर तरूणाचे कुटुंब शेतकरी असून अत्यंत गरीब परिस्थितीत आहे  त्यांच्या पश्‍चात आई, चार बहीणी  व सतत आजारी असणारे वडील आहेत.  घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून कर्जाचा डोंगर आहे. चार बहिणींची लग्न कसे होणार या त्रासिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचे सरपंच भरत काळे यांनी सांगितले मृतदेहचे जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला आहे ग्रामीण रुग्णालयाच्या रिपोर्टनूसार जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मुत्यु ची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पो हे काँ बढे करत आहेत.