ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला निर्णय मान्य नाही, सुरेंद्र बागलकर कोर्टात
मुंबई, दि. 25 - ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला नशिबाचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत . ईश्वर चिठ्ठीऐवजी टेंडर व्होट प्रक्रिया केली जावी यासाठी बागलकर कोर्टात जाणार आहेत. महापालिकेच्या वार्ड 220 मध्ये शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर आणि भाजपच्या अतुल शहांना 5946 इतकी समसमान मतं पडली होती.
दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यानं फेरमतमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणीतही मतांमध्ये कोणताच फरक न पडल्यानं ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीने लॉटरी पद्धतीनं भाजपच्या अतुल शहांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र लॉटरी पद्धतीनं झालेला निर्णय मान्य नसल्यानं पाच टेंडर वोट मोजले जावेत यासाठी सुरेंद्र बागलकर कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यानं फेरमतमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणीतही मतांमध्ये कोणताच फरक न पडल्यानं ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीने लॉटरी पद्धतीनं भाजपच्या अतुल शहांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र लॉटरी पद्धतीनं झालेला निर्णय मान्य नसल्यानं पाच टेंडर वोट मोजले जावेत यासाठी सुरेंद्र बागलकर कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.