Breaking News

कोरठणला दुसर्‍या दिवशी लाखांच्यावर भाविकांची गर्दी

अहमदनगर, दि. 14 - ’येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडारा व खोबर्या ची मुक्त उधळण करीत भाविकांच्या   मांदियाळीत खंडोबाचा पालखी सोहळा रंगला. राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील कोरठण खंडोबाच्या यात्रेत  दुसर्‍या दिवशी तीन  लाखच्यावर च्यावर भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले.
पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. राज्यातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत असून  यात्रेला विशेष महत्व आहे. गुरुवारी  पहाटेपासून  यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर सकाळी चांदीच्या सिंहासनाचे व उत्सव मूर्तीचे अनावरण होऊन भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.आज दुसर्‍या  दिवशीची पूजा पहाटेची पूजा मांजरवाडी (ता , जुन्नर )येथील  शाम मुळे व प्रिया मुळे  या दापत्याच्या हस्ते करण्यात आली तरचिपळूण च्या  मयुरी दळवी यांच्या  हस्ते महाआरती झाली यावेळी देवस्थानाचे अध्यक्ष पाडुरंग गायकवाड ,रामदास मुळे ,  धोंडिभाऊ जगताप  ,दत्तात्रय  खोसे,न्यानदेव घुले , लक्ष्मण सुंबरे , प्रकाश  सुंबरे  सह शेकडो भक्त उपस्थित होते  आरती  झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी  रांगा लावल्या होत्या . दिवसभर तळी भांडार व देवदर्शन चालू असताना सुमारे  तीनच्यावर लाख भाविकांनी ’येळकोट येळकोट जय मल्हार’ व ’सदानंदांचा यळकोट, कोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं’ या जय घोषाने खंडोबानगरी दुमदुमुन  गेली होती.मा आ.  सीताराम मामा घनदाट , प स सदस्य भास्कर शिरोळे, सभापती गणेश शेळके , जी प सदस्य बाबासाहेब तांबे , वीजवितरण उपअभियंता श्री  प्रजापती , कृषी अधिकारी रामदास दरेकर  मान्यवरांनी  देवदर्शन घेतले तर अनेक शेतकरी , भक्तांनी आपले बैल देव दर्शनाला आणले होते
पारनेर,शिरूर,जुन्नर आगाराने जादा  बसेसची व्यवस्था केल्याने भाविकांची सोय झाली. यात्रेच्या नियोजनासाठी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.पांडुरंग गायकवाड  यांच्यासह विश्‍वस्त,ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. रात्री पिंपळगावरोठा गावात मुक्कामी असलेली खंडोबाची पालखी व छबीना मिरवणुकीने सकाळी अकरा वाजता  कोरठण खंडोबा मंदिराकडे येत असताना रस्ता गर्दीने फुलून गेला होता. शेकडो युवक व खंडोबाची गीते म्हणणार्या महिलांमुळे वातावरण भक्तिमय बनले  होते.देवस्थानचे अध्यक्ष अँड.पांडुरंग गायकवाड यांनी पालखी सोहळा मंदिराच्या पायरीनजीक आल्यावर पालखी मानकरी व उपस्थितांचा गौरव करण्यात  आला.पुणे, मुंबई, नाशिक,अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद आदि जिल्हातून आज भाविक आले होते.