लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर पिपाणी अंदोलन
औरंगाबाद, दि. 13 - समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करणा-या शेतकर्यांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मोर्चे, निदर्शने, करण्याचे ठरविले असून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूतगिरणी चौकातील घरासमोर बुधवारी पिपाणी वाजवून आंदोलन करून सुरूवात केली आणि मागण्यांच्या निवेदनाची प्रत दानवे यांच्या घराला चिटकवली.
सध्या मुंबईला जाण्यासाठी दोनमार्ग अस्तित्वात आहेत. या मार्गाचे भूसंपादन करताना शेतक-यांसमोर कोणतीही सुनावणी होत नाही. त्यांना पूर्वसूचना न देता मार्किंग करून पोल रोवण्याचे काम सुरू आहे. हा संपूर्ण प्रकल्प मनमानी करून सरकार रेटून नेत असल्याची भावना गरीब शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. लोकप्रतिधिींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मोर्चे, निदर्शने, धरणे, उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पिपाणी आंदोलनासाठी जयाजीराव सूर्यवंशी, सुभाष लोमटे आदींची उपस्थिती होती.
सध्या मुंबईला जाण्यासाठी दोनमार्ग अस्तित्वात आहेत. या मार्गाचे भूसंपादन करताना शेतक-यांसमोर कोणतीही सुनावणी होत नाही. त्यांना पूर्वसूचना न देता मार्किंग करून पोल रोवण्याचे काम सुरू आहे. हा संपूर्ण प्रकल्प मनमानी करून सरकार रेटून नेत असल्याची भावना गरीब शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. लोकप्रतिधिींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मोर्चे, निदर्शने, धरणे, उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पिपाणी आंदोलनासाठी जयाजीराव सूर्यवंशी, सुभाष लोमटे आदींची उपस्थिती होती.