दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे 30 जवान ठार झाल्याची हाफिज सईदची बढाई
नवी दिल्ली, दि. 13 - दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे 30 जवान ठार झाल्याची दरपोक्ती जमात-उद-दवाहचा म्होरक्या हाफिज सईदने केली आहे. चार पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सोमवारी अखनूरमध्ये केलेल्या हल्ल्यात 30 भारतीय जवान ठार झाले असून ही कारवाई म्हणजे भारतावर करण्यात आलेला लक्ष्यभेदी हल्ला असल्याचे त्याने म्हटले आहे. हाफिजने एका ध्वनीफितीच्या माध्यमातून ही वक्तव्ये केली आहेत. ही ध्वनीफित पाकिस्तानातील काश्मीरची राजधानी असलेल्या मुझफ्फराबादमधील एका भाषणादरम्यान काढण्यात आल्याचे समजते. ही ध्वनीफित दोन मिनिटांची असून त्यात हाफिजने उर्दू भाषेचा वापर केला आहे.
मात्र हा हल्ला कोणत्या संघटनेकडून करण्यात आला याबाबत त्याने माहिती दिलेली नाही. हा हल्ला म्हणजे भारताकडून करण्यात आलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याचे प्रत्युत्तर असल्याचे त्याने यात म्हटले आहे.
मात्र हा हल्ला कोणत्या संघटनेकडून करण्यात आला याबाबत त्याने माहिती दिलेली नाही. हा हल्ला म्हणजे भारताकडून करण्यात आलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याचे प्रत्युत्तर असल्याचे त्याने यात म्हटले आहे.