Breaking News

आता इंग्लंडला व्हाईटवॉश द्या : गांगुली

कोलकाता, दि. 03 - विराट कोहलीचा भारतीय संघ कसोटी मालिकेत इंग्लंडवर विजय मिळवेल, असा विश्‍वास टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गांगुलीने भारतीय संघाबद्दल विश्‍वास व्यक्त केला.
भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. आता भारतीय संघ इंग्लंडला सामोरे जाणारे आहे. गांगुली म्हणाला, भारतीय संघ सध्या  उत्तम फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडप्रमाणेच टीम इंडिया आता आणखी एक व्हॉईटवॉश देईल, असा मला विश्‍वास आहे. इंग्लंडने सतर्क राहायला हवे यापूर्वी इंग्लंडचा  माजी कर्णधार मायकल वॉननेही इंग्लंडची फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचे म्हटले होते. तसेच फिरकी गोलंदाजांना सामोरे जाताना फलंदाजही अडखळत  होते, हे बांगलादेशात दिसून आले, असे वॉन म्हणाला. भारताच्या अश्‍विन आणि रवींद्र जाडेजासारख्या उत्तम फिरकीपटूंना सामोरे जाताना, इंग्लंडला प्रचंड  सावधानता बाळगायला हवी, असेही वॉनने नमूद केले.