’मला बाजू मांडू दिली नाही’, सायरस मिस्त्रींचे टाटा संचालक मंडळाला पत्र
मुंबई, दि. 27 - टाटा ग्रुपच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर पहिल्यांदाच सायरस मिस्त्री यांची कथित बाजू समोर येते आहे. मिस्त्री यांनी टाटाच्या संचालक मंडळाला एक गोपनीय ई-मेल करुन आपली बाजू मांडल्याचे सांगण्यात येत आहे. या पत्रात सायरस यांनी टाटा ग्रुपवर अनेक आरोप केले आहेत. तसेच आपल्याला कधीच कामाचे स्वातंत्र्य मिळाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
असेही म्हटले जात आहे की, सायरस यांनी तब्बल 5 पानी मेल लिहला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या निर्णयाने त्यांना फार धक्का बसला आहे. आणि ग्रुपला देखील याचे परिणाम भोगावे लागू शकतात. कारण की, टाटा समूहाला 1 लाख 18 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला पदावरुन काढून टाकल्याने आपल्या इमेजला धक्का बसल्याचे सायरस यांचे म्हणणे आहे. तसेच आपल्या बाजूही मांडू दिले नसल्याचे सायरस यांनी म्हटले आहे.
असेही म्हटले जात आहे की, सायरस यांनी तब्बल 5 पानी मेल लिहला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या निर्णयाने त्यांना फार धक्का बसला आहे. आणि ग्रुपला देखील याचे परिणाम भोगावे लागू शकतात. कारण की, टाटा समूहाला 1 लाख 18 हजार कोटींचे नुकसान होऊ शकते. अशा पद्धतीने आपल्याला पदावरुन काढून टाकल्याने आपल्या इमेजला धक्का बसल्याचे सायरस यांचे म्हणणे आहे. तसेच आपल्या बाजूही मांडू दिले नसल्याचे सायरस यांनी म्हटले आहे.