Breaking News

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत भारताकडून चीनचा धुव्वा

मुंबई, दि. 26 - आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने चीनचा 9-0 असा धुव्वा उडवला. चीनवर मात करत भारताने उपांत्य फेरीचे तिकीट कन्फर्म केले आहे.  त्याचप्रमाणे भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
कुआन्तानमध्ये आलेल्या पावसामुळे हा सामना उशिराने सुरु झाला होता. मग भारतीय संघानेही गोल्सची बरसात केली आणि चीनच्या बचावाच्या चिंधड्या  उडवल्या. भारताकडून आकाशदीप सिंगने नवव्या आणि 39 व्या मिनिटाला गोल केले. अफ्फान युसूफने 19 व्या आणि 40 व्या मिनिटाला गोल्सची नोंद केली तर  जसजीत सिंग खुल्लरने 22 व्या आणि 51 व्या मिनिटाला गोल डागले.
रुपिंदर पाल सिंग, निकिन तिमय्या आणि ललित उपाध्यायनंही प्रत्येकी एक गोल डागला. भारताचा हा चार सामन्यांमधला तिसरा विजय ठरला. या विजयासह  भारताच्या खात्यात दहा गुण जमा झाले असून, भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेशही निश्‍चित झाला आहे.