Breaking News

विद्या बालनचा ‘कहानी’ सिनेमाचा सिक्वेल

दिग्दर्शक सुजय घोष हे आता ‘कहानी’चा सिक्वेल आणणार आहेत. कोलकाता येथे झालेल्या 40 व्या आंतरराष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शनात बोलताना त्यांनी ‘कहानी’ परत येणार असल्याचे जाहीर केले. ‘कहानी’ हा गूढपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. कोलकातामध्ये दुर्गापूजेत बेपत्ता झालेल्या पतीचा पत्नीने घेतलेला शोध यात दाखविला आहे. विद्या बालन हिने यात विद्या बागची ही गर्भवती पत्नीची भूमिका साकारली होती. भारतीय पुरुषसत्ताक
पद्धतीत स्त्रीवाद आणि मातृत्वाचे स्थान यावर या चित्रपटात भर देण्यात आला होता.