Breaking News

भारताने पाकिस्तानला 5 विकेट्स राखून धूळ चारली

ढाका, 28 -  विराट कोहली आणि युवराज सिंह यांच्या संयमी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हाय होल्टेज सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 विकेट्स राखून धूळ चारली. कोहलीचे अर्धशतक एका धावेने हुकले असले तरी त्याच्या फलंदाजीने भारतीयांचीच नव्हे तर पाकिस्तानी चाहत्यांचीही मने जिंकली. 
धोनीच्या टीम इंडियानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करून आशिया चषकात आपला सलग दुसरा विजय साजरा केला. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले.
आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळले. हार्दिक पंड्याने तीन तर रवींद्र जाडेजानं दोन विकेट्स काढल्या. त्यानंतर विजयासाठी 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचीही पडझड झालेली पाहायला मिळाली. मोहम्मद आमिरने रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला भोपळाही न फोडता माघारी धाडले. आमिरनेच रैनाचीही विकेट काढली. त्यामुळे भारताची अवस्था तीन बाद 8 अशी केविलवाणी झाली होती. पण विराट कोहली आणि युवराज सिंगने भारताला संकटातून बाहेर काढले आणि टीम इंडियाचा विजय निश्‍चित केला.