मुख्यमंत्री घोषणा करुन निघून जातात -राणे
मुंबई, 29 - फडणवीस सरकारमध्ये विकास पूर्णत: ठप्प झाला आहे. सरकारने याची माहिती घ्यावी. मुख्यमंत्री येतात आणि घोषणा करुन निघून जातात. मात्र विकास कामासाठी पैसे येत नाही अशी टीका राणेंनी केल. तसेच जैतापूरच्या जमिनी हस्तांतरण करताना जो दर दिला तोच दर कोकणात महामार्गासाठी जमिनी देणार्या शेतकर्यांना द्या, अशी मागणीही त्यांनी केली. महामार्गाच्या चौपरीकरणासाठी पोलीस घरात घुसून जमिनी ताब्यात घेतल्या जाणार असतील, तर कोकणात तसे होऊ देणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.